आयुष्याच्या एका रम्य सायंकाळी मी शांत, मुग्ध मनाने समुद्रकिनारी बसले होते. क्षितिजभर पसरलेला रत्नाकर... लाटांचा रंगात आलेला पाठशिवणीचा खेळ... कुठे दूरवर स्वच्छंदी मुक्त भरारी घेणारा समुद्रपक्षी.. सारं काही न्याहाळत मी मऊ मऊ वाळूच्या सानिध्यात सोनेरी स्वप्नांचे असंख्य मनोरे उभारत एका विलक्षण मनःशांतीचा अनुभव घेत होते.
इतक्यात अचानक समुद्रात एक वादळ उठले. संपूर्ण समुद्रच ढवळून काढणारे तुफान... पण या समुद्राने त्या वादळाला अलगद एका थैलीत भरले आणि ती थैली हळूच माझ्या मनात रीती केली.. तेव्हापासून समुद्र माझ्यापासून खूप दूर गेला... खूप खूप दूर...
✍️निकिता विचारे