मला माझ्या सीमा कधी आखाव्याच लागल्या,
तर तू माझा किनारा व्हावं..
लागल्याच कधी संवेदना विरघळाव्या,
तर ते जलाशय तुझ्या हृदयी असावं..
जीवनाच्या रणभूमीवर झालेच कधी द्विधा,
तर तुझ्याच वाणीत कृष्णरूप दिसावं..
असित्वाच्या लढाईत झालीच माझी राख,
तर त्यातून फिनिक्स होऊन 'तू' उडावं..
✍️निकिता सु. विचारे
No comments:
Post a Comment