Saturday, October 1, 2016

आठवणी

तू म्हणजे पंचपक्वान्नाचं ताट अचानक समोर आलेलं,
मी मात्र निर्जळ व्रत आजन्म घेतलेलं...

तू म्हणजे कृष्णाच्या बासरीची धून गहरी,
मी मात्र तुझ्या कथेतील हंसीण बहिरी...

तुला हवी माझ्याकडून रूक्मिणीची प्रीती ,
मला मात्र सदासर्वदा मीरेचीच स्मृती...

तुला कवितांचा नाद तुझ्या शब्दांत गोडी,
मी तुझ्यासाठी वेडी पण पायांत बेडी...

कसा होणार मिलाप आपला समोर उभे प्रश्न किती ,
त्यातच मला सावर म्हणता म्हणता तुझ्याच पडण्याची भीती...

.............निकिता सु. विचारे

3 comments: